“निसर्ग हा बलवान आहे,व तोच मानवी जीवनाचा आधार आहे.त्याला प्रदूषण करून दुषित करणे,निसर्गविरोधी कृती योजना करून निसर्गाशी कुस्ती करू नये.तर निसर्गाशी दोस्ती करून पर्यावरण पूरक विकास करावा.यासाठी खनिज तेलावर चालना-या वाहनां एवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवावा”.असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.ई-ड्राईव्ह या इलेक्ट्रिक शक्तीवर चालणा-या रिक्षा-टेम्पो-व मालवाहतूक गाड्यांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.स्वप्नशिल्प हॉल येथे सायंकाळी झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी खा.श्रीरंग अप्पा बारणे,मा.नगरसेवक अभय छाजेड,निरंजन दाभेकर(E-Drive),मयूर कडू(E-Drive),तानाजी शिंदे(अतिरिक्त आयुक्त पीसीएमसी),बाळासाहेब दाभेकर(ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते),संदीप पाटील(अभिनेते),ईशा अग्रवाल आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते.मालवाहतूक करणा-या वाहनाची क्षमता १ टन आहे.व प्रवाशी वाहतूक करणा-या वाहनाची क्षमता ५ प्रवाशी आहे.तीन तासात चार्ज झाल्यावर हे वाहन १०० किमी प्रवास करते.ग्रामीण भागात ही वाहने विशेष उपयुक्त असून शेतकरी ही याचा लाभ घेवू शकतात असे वितरक निरंजन दाभेकर व मयूर कडू यांनी यावेळी सांगितले
छायाचित्र:इलेक्ट्रिक वाहनाचे उद्घाटन करताना गिरीश बापट,निरंजन दाभेकर,मयूर कडू,संदीप पाटील व अन्य
© 2011. Peoples Media Pune