“प्रबोधनकार ठाकरे हे हिंदु धर्मात सुधारणावादी असणारे प्रखर समाज सुधारक होते.तसेच परखड विचारवंत होते.महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता.बालविवाह,सतीप्रथा,व अन्य अनिष्ट्र प्रथांन त्यांनी विरोध केला ते कृतीशील विचारवंत होते,ते महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रणी होते.त्यांचा वारसा हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समर्थपणे चालविला आहे”.असे प्रतिपादन शिवसेना प्रवक्ता आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी केले.प्रबोधनकार ठाकरे यांच्या १३२ व्या जयंती निमित्त शिवसेना भवन येथे आदरांजली वाहताना त्या बोलत होत्या.मा.प्रबोधनकार ठाकरे,मा,बाळासाहेब ठाकरे,मा.मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.या प्रसंगी निर्मलाताई केंडे(सहसंपर्क संघटक महिला आघाडी),अशोक हरणावळ(मा.गटनेते),राजेंद्र शिंदे(मा.उपशहर प्रमुख),सुदर्शना त्रिगुणाईत(शहर संघटक महिला आघाडी),रेखा कोंडे,अमृत पठारे,मकरंद पेठकर(कार्यालय प्रमुख),मनिष जगदाळे,राजू विटकर,अमोल घुमे आदी मान्यवर उपस्थित होते.
© 2011. Peoples Media Pune