“आपल्याला जन्म देणारे मातापिता,जगाचा निर्माता देव,पालक देश,मार्गदर्शन करणारे गुरु यांच्या प्रमाणेच देशासाठी शहीद झालेले जवान हे सुद्धा प्रात:स्मरणीय आहेत.जो समाज आपल्या शहिदांना विसरतो तो अधोगतीस जातो.या सर्वांचे आभार मानत जीवन आनंदाने व सत्कर्म करीत जगले पाहिजे”असे प्रतिपादन प.पु.सुधांशुजी महाराज यांनी केले.विश्व जागृती मिशनच्या वतीने आयोजित गुरुपोर्णिमा महोत्सव कार्यक्रमात ते मार्गदर्शन करीत होते.गणेश कलाक्रीडा केंद्र येथे संपन्न झालेल्या कार्यक्रम प्रसंगी विश्वजागृती मिशन पुणे मंडलचे अध्यक्ष घनश्याम झंवर,उपाध्यक्ष गणेश कामठे,विष्णूभगवान आगरवाल,श्याम मरळ आदी मान्यवरांच्या बरोबरच हजारो भाविक नागरिक उपस्थित होते.
छायाचित्र :गुरुपूजन करताना पदाधिकारी व नागरिक
© 2011. Peoples Media Pune