स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच नव्हे तर तमाम महाराष्ट्राच्या आऊ राजमाता जिजाऊसाहेब यांच्या ४२१ व्या जयंतीनिमित्त शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी लालमहाल येथील जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या प्रसंगी नगरसेविका पल्लवीताई जावळे,नगरसेवक बाळासाहेब ओसवाल,प्रतीक्षा ढमढेरे,वर्षा सावळे,अनिता परदेशी,शेलार गुरुजी,अश्विनी शिंदे,नसीम शेख,अतुल दिघे,तम्मा विटकर,राहुल जेकटे विलास कथलकर आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलतान आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले.त्याचा पाया जिजाऊ साहेबांनी महाराजांच्या संगोपनातून घातला.त्या सदैव आदर्श मातृत्वाच्या एक कालातीत उदाहरण म्हणून स्मरणात राहतील असे सांगितले.
© 2011. Peoples Media Pune