विश्व जागृती मिशन पुणे मंडलच्या वतीने बुधवार दिनांक २० फेब्रुवारी ते रविवार दिनांक २४ फेब्रुवारी दरम्यान “विराट भक्ती सत्संग”,या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम वर्धमान सांस्कृतिक केंद्र(मार्केटयार्ड),गंगाधाम-कोंढवा मार्ग,आई माता मंदिराजवळ संपन्न होईल.बुधवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी शुभारंभ संध्याकाळी ५ ते ७.३० भक्ती सत्संग ने होईल.प.पू सुधांशुजी महाराज यांचे प्रवचनाने.२१ व २२ फेब्रुवारीला सकाळी ९ ते ११.३० भक्ती सत्संग(सुधांशुजी महाराज यांचे प्रवचन),व संध्याकाळी ५ ते ७.३० भक्ती सत्संग.होईल.शनिवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी योग गुरु अर्चिकादीदी या सकाळी ८.३० ते १०.३० वेळेत ध्यानधारणा घेतील.तर संध्याकाळी ४.३० ते ६.३० अमृत वर्षा(प्रवचन)करतील.रविवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता भक्तांना मंत्रदीक्षा दिली जाईल.हा सर्व कार्यक्रम सर्वाना विनामुल्य खुला आहे.मिशनचे देशभरात ६५ आश्रम आहेत.गोशाळा,५ स्कूल,१ गुरुकुल,हॉस्पिटल व आयुर्वेद चिकित्सा रुग्णालय आहे.संस्थेचे मुख्यालय दिल्ली येथील आनंदधाम आश्रम आहे.अशी माहिती घनश्याम झंवर(प्रधान पुणे मंडल),विष्णूभगवान आगरवाल(महासचिव),गणेश कामठे(उपप्रधान),रविंद्रनाथ द्विवेदी(संघटन सचिव)यांनी पत्रकार परिषदेत दिली व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
© 2011. Peoples Media Pune