गुरुवार दिनांक २५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता थेट शेतकरी ते ग्राहक महाराष्ट्र माझा या आंबा महोत्सवाचे बालगंधर्व येथे उद्घाटन होत आहे.माजी नगरसेवक व स्वयंरोजगार विभाग,पुणे शहर अध्यक्ष,मनसे अनिल राणे यांच्या हस्ते उद्घाटन होईल.या प्रसंगी आयोजक आरती सहाणे,रवी सहाणे व स्वयंरोजगार टिम उपस्थित राहणार आहे. १० वर्षापूर्वी आरती सहाणे,रवी सहाणे यांनी शेतकरी ते थेट ग्राहक आंबा महोत्सवास सुरुवात केली होती.येथे नैसर्गिकपणे पिकविलेले रत्नागिरी व देवगड येथील हापूस आंबे मिळत असल्याने याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
रवी सहाणे यांनीच १० वर्षापूर्वी परप्रांतीय व बांगलादेशी कृत्रिमरीतीने आंबा पिकविणार्या विरुद्ध आणि देवगड रत्नागिरी च्या नावाखाली कर्नाटक आंबे विकणार्या विरुद्ध आंदोलन छेडले होते त्यानंतर रवी सहाणे यांनी कोकणातील आंबा उत्पादकांना एकत्र करून थेट शेतकरी ते ग्राहक महाराष्ट्र माझा आंबा म्होत्सवाची सुरुवात केली.
आंबा शेतकरी व ग्राहक यांना एकत्र करणार्या या उपक्रमास पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून शेतकरी व महिला बचतगट यांना बाजारपेठ ही मिळत आहे.हा आंबा महोत्सव २५ एप्रिल पासून सकाळी ९ ते रात्री ९ खुला राहणार आहे.
© 2011. Peoples Media Pune