भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेच्या वतीने ६ते १२ वर्षीय मुलामुलींसाठी बाल आनंद मेळावा संपन्न झाला.यात सुमारे २५० विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होते.यासाठी १७ दिवस रोज ४.३० ते ६.३० या वेळेत त्यांना विविध खेळ,कराटे,धनुर्विद्या,रांगोळी,चित्रकला,व खेळ यांचे प्रशिक्षण देण्यात आले.अहिल्यादेवी प्रशालेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मोतीबाग नगर संघचालक शरदराव चंद्रचूड,संजय कुलकर्णी,भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे विकास दामले,राष्ट्रसेविका समितीच्या ज्योति भिडे,आशाताई कुलकर्णी(प्रशिक्षक),अश्विनी देशपांडे,प्रसाद खेडकर आदि मान्यवरांच्या बरोबरच पालक उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना संजय कुलकर्णी यांनी मुलांना चांगल्या सवयी –संस्कार हे ६ ते १२ वयोगटातच होतात.म्हणून पालकांनी या वयात त्यांच्यावर चांगले संस्कार व सवयी लावाव्यात असे प्रतिपादन केले.व घर ही पहिली शाळा व पालक हे पहिले शिक्षक असतात असे संगितले.
छायाचित्र :विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक
© 2011. Peoples Media Pune