राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंती निमित्त ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या वतीने “आय टी एक्सलन्स पुरस्कार”,वितरण समारंभ संपन्न झाला.मराठा चेंबर्सच्या सेनापति बापट रस्ता येथील सुमंत मुळगावकर सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आयोजक अभय छाजेड(महाराष्ट्र प्रदेश कोंग्रेस कमिटी सरचिटणीस),गिरीश राव(ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस अध्यक्ष),संगणक तज्ञ डॉ.दीपक शिकरपूर,खा.वंदनाताई चव्हाण,ज्येष्ट उद्योजक पद्मश्री अनू आगा,आदि मान्यवर उपस्थित होते.आय टी एक्सलन्स पुरस्कारप्राप्त मान्यवर- आनंद खांडेकर यांना जीवन गौरव(आयटी),आविनाश गुप्ता(ट्रायमॅस कंट्रोल मुख्य कार्यकारी अधिकारी),योगेश पंडित(हेक्झानिका लि,संस्थापक),डॉ.दीपली सवाई(उद्योग तंत्रशिक्षण संस्था),तसेच रोहन मोरे यांना विशेष सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले.शाल श्रीफल,पुष्पगुच्छ,मानपत्र,व राजीव गांधी यांचे पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप होते.या प्रसंगी बोलताना अनू आगा यांनी आय टी क्षेत्राने क्रांति आणली,पूर्वी उद्योगात संपत्तिचेच महत्व होते.मात्र आयटी ने सर्वसामान्य लोकांनाही धनिक केले. दीपक शिकारपूर यांनी तंत्रज्ञान वेगाने बदलत असून आपणही त्या बरोबर आपल्या उद्योगात बदल करावे असे संगितले.
छायाचित्र :पुरस्कार प्राप्त व मान्यवर यांचे समूहचित्र
© 2011. Peoples Media Pune