कसबा पेठेत अनेक वाडे असून अजूनही मोठ्या प्रमाणात वाडासंस्कृती तग धरून आहे.त्यातीलच वीर मित्रमंडळ हे वाडासंस्कृती जपणारे आहे.११३५ सुपेकर वाडा येथील या मंडळाचे ५६ वे वर्ष आहे.गेली कित्येक वर्ष विनाखड्डा मांडव(पाईपचा) तयार करण्यात येतो.साधीशी परंतु सुंदर सजावट करण्यात येते.रोज सकाळी लहान मुले अथर्वशीर्ष म्हणतात,विविध संस्कृतिक कार्यक्रम करण्यात येतात.स्पीकरवर फिल्मी गाणी वाजविण्यात येत नाहीत.व सर्व खर्च सभासद स्वखर्चाने करतात.काही सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. यात भंडारा(स्नेह भोजन),गणेशजन्म,शिवजयंती,स्वातंत्र्यदिन यांचा समावेश असतो. यात अध्यक्ष हरिष जराड,उपाध्यक्ष वेदान्त चव्हाण,ऋतिक साठे,गजानन महाडीक,डुब्या उर्फ अभिषेक घोलप व अन्य सदस्य यात सक्रिय सहभाग घेतात.
छायाचित्र :वाड्यासमोरील मंडपात अथर्वशीर्ष म्हणताना मुले
© 2011. Peoples Media Pune