“आपण आपल्या मुला मुलींना शिक्षण,संपत्ती,साधने देतो,मात्र तेव्हडे केले म्हणजे कर्तव्य नव्हे तर त्यांच्यावर योग्य ते संस्कार घडविणे,त्यांना माणूस म्हणून घडविणे,एहिक तसेच आध्यात्मिक ज्ञान ही द्यायला हवे.व आध्यात्मिक व भौतिक दोन्ही बाबी योग्य प्रकारे कशा साधाव्या याचे ज्ञान सद्गुरू देतात’. असे प्रतिपादन प.पू सुधांशु महाराजांनी केले.ते विश्व जागृती मिशन आयोजित ५ दिवसीय भव्य विराट भक्ति सत्संग व गुरुमंत्र सिद्धी साधना या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी घनश्याम झंवर अध्यक्ष पुणे मंडल,महामंत्री विष्णुभगवान आगरवाल,उपाध्यक्ष गणेश कामठे,व संघटन सचिव रविंद्रनाथ द्विवेदी आदि मान्यवरांच्या बरोबरच भाविक नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
छायाचित्र :प.पू सुधांशुजी महाराज दीपप्रज्वलन करताना.
© 2011. Peoples Media Pune