शिवसेनेच्या वतीने उपशहर प्रमुख आनंद गोयल यांच्या वतीने येरवडा येथील राजीव गांधी हॉस्पिटल समोर महाशिवरात्री निमित्त नागरिकांना खिचडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.याचे उद्घाटन विधान परिषद उपसभापती आ.डॉ.नीलमताई गो-हे व पश्चिम महाराष्ट्र उपनेते रविंद्रजी मिर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी शहर प्रमुख संजय मोरे आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.आज दिवसभर खिचडी वाटप करण्यात आले.सुमारे १८०० किलो खिचडीचा ७० हजाराहून अधिक नागरिकानी लाभ घेतला.या प्रसंगी बोलताना विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी “शिवसेना नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या अन्न विषयक कामात पुढे असते.या ठिकाणी आगामी काळात शिवभोजन थाळी ही देण्याचा मानस असल्याचे संगितले.रवींद्रजी मिर्लेकर यांनी बोलताना या उपक्रमाचे स्वागत केले व अनेक वर्ष हा उपक्रम राबविल्याचे कौतुक केले.
छायाचित्र :खिचडी वाटप करताना नीलम गो-हे,रविंद्र मिर्लेकर,आनंद गोयल,संजय मोरे.
© 2011. Peoples Media Pune