अंजुमन इत्तेहाद तांबोलीयन जमातचा सामुदायिक विवाह सोहळा आंबेडकर कॉलेज, नाना पेठ येथे संपन्न झाला. यावेळी ९ जोडप्यांचा विवाह हजारो नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला. जमातीच्या वतीने करण्यात येणारा ह ३३ वा सोहळा असून सामुदायिक विवाह प्रथेची सुरूवातच सर्वात प्रथम तांबोळी समाजानेच केली. या सोहळयाप्रसंगी नजीरभाई धायरीवाले (अध्यक्ष), हाजी नजीरभाई ईटवाले (जनरल सेक्रेटरी), लतिफभाई वाडेवाले (कार्याध्यक्ष), हाजे उस्मानभाई तांबोळी, सलीमभाई झापवाले (उपाध्यक्ष), आदी मान्यवरांबरोबरच मोहनसिंग राजपाल (महापौर), गणेश बिडकर (स्थाई समिती अध्यक्ष), आरिफ बागवान (नगरसेवक), रामदास आठवले (आरपीआय अध्यक्ष), तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर वधु-वरांस आशिर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इस्लामी पध्दतीने धार्मिक विधी झाल्यानंतर सामुहिक दुआ पठण करण्यात आले व यानंतर सर्वांनी सहभोजनाचा आनंद घेतला
© 2011. Peoples Media Pune