आषाढी एकादशी निमित्त शांति निकेतन सेवा प्रतिष्ठान व स्वामी बॅग यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांना ११००१ तुलसी व विविध फळे.फुले आणि शोभिवंत रोपांचे वाटप करण्यात आले.विठ्ठलवाडी मंदिर कमान सिहगडरोड यथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी खा.सुप्रियाताई सुळे, मा.आमदार कुमारभाऊ गोसावी,,आमदार भीमराव तपकीर,नगरसेवक श्रीकांत जगताप,मनीषाताई नागपुरे,ज्योतीताई गोसावी,काका चव्हाण,बाळासाहेब नवले,शैलेश चरवड,बाळासाहेब कापरे,स्वामी बॅगचे राहुल जगताप,शांतीनिकेतनचे दीपक परदेशी विलास बनसोडे,श्री बोरसे,श्री खुडे,श्री अहिरराव,श्री मावळे,श्री खाडे,श्री मते,संतोष परदेशी आदी मान्यवर उपस्थित होत्या.यावेळी बोलताना सुप्रियाताई यांनी झाडे लावणे ती जगवणे हा एक कार्यक्रम नसून तो पर्यावरण रक्षणासाठी पायाभूत उपक्रम आहे असे सांगितले.राहुल जगताप(स्वामी बॅग)यांनी बोलताना गेली १७ वर्ष हा उपक्रम सामाजिक भावनेने राबवीत असून संत तुकाराम महाराज यांचा “वृक्षवल्ली आम्हा सोयरे”ही शिकवण आहे असे सांगितले.
छायाचित्र:खा सुप्रियाताई सुळे व अन्य मान्यवर रोपे वाटप करताना
© 2011. Peoples Media Pune