पावसाळ्यात नानापेठ भवानी पेठ येथील परिसराचे पाणी १५ ऑगस्ट चौक परिसरात तुंबते कारण हा भाग बशीप्रमाणे खोलगट आहे.त्यामुळे थोडाजरी पाऊस झाला तरी परिसरात गुडघाभर पाणी साठते.याची दखल घेवून अश्विनी मित्रमंडळ ते हॉटेल पद्मकृष्ण अशा ६०० एमएम व्यासाच्या पावसाळी जलवाहिनीच्या कामाचे शुभारंभ सदानंद शेट्टी(माजी स्थायी समिती अध्यक्ष),व सुजाताताई शेट्टी(नगरसेविका)यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी इक्बाल शेख,राहुल चव्हाण,सुनील अय्यर,अबरार शेख,ताहेरभाई खान,संतोष सरोदे,मंगेश साखरे,शंकर रामलर,राजेंद्र परदेशी,मुमताज खान,आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
छायाचित्र ;पावसाळी जलवाहिनी कामाचे उद्घाटन करताना सदानंद शेट्टी,सुजाताताई शेट्टी व
© 2011. Peoples Media Pune