पुण्यात वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे.व अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.अपघातांमध्ये कित्येकदा वाहतूक नियम न पाळणे हे कारण असते.यासाठी जनजागृती व्हावी म्हणून रोटरी क्लब ऑफ धायरी व सूर्योदय प्रतिष्ठान व कै वस्ताद हरिभाऊ दादा पोकळे शाळेतील विद्यार्थिनी यांच्या संयुक्त विद्यमाने धायरी फाटा,चौक येथे जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले.यात सुमारे ९० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.यावेळी त्यांनी हातात फलक घेतले होते.व विविध घोषणा दिल्या “जिथे मोबाईलवर लक्ष तिथे यमराज दक्ष”. “हेल्मेट जर असेल डोक्यावरी तर नाही जाणार तुम्ही देवाघरी”इत्यादी.या प्रसंगी रोटरी धाय्रीचे अध्यक्ष ऋषिकेश महाजन,सचिव सुप्रिया निगडे,संस्थापक अध्यक्ष रो.डॉ.राजेंद्र भवाळकर,सूर्योदय प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रतिभा पाटील,रो.सुवर्णा माने,रो.भरत दवे,सुहास चव्हाण,वैभव लामतुरे,संध्या देपोलकर,मुख्याध्यापिका अनिता रेंगडे,वंदना पेठकर,अमित जगताप व शाळेतील कर्मचारीवर्ग उपस्थित होता.
छायाचित्र :धायरीफाटा रस्ता येथे वाहतूक जनजागृती करताना विद्यार्थिनी व मान्यवर
© 2011. Peoples Media Pune