पंढरीच्या दिशेने पायी वाटचाल करणार्या वारकरी बांधवांचा पुण्यात आगमन झाले असून पुण्यनगरीतील नागरिक विविध प्रकारे त्यांची सेवा करीत असतात.लायन्स क्लब गणेशखिंडच्या वतीने वारकर्यांची कांस्याच्या थाळीने चरणसेवा करण्यात आली.यात गोल फिरणार्या काशाच्या थळीवर तळपाय ठेवून त्यावर तेल टाकले जाते व मालीश केली जाते.तसेच हातांचीही यंत्राद्वारे मालीश केली. शुक्रवारपेठेतील शिराळशेठ चौक येथे झालेल्या या उपक्रमात ला.शाम खांडेलवाल,ला.दीपक लोया,कांतीलाल पालेशा,विजय भंडारी यांनी सहभाग घेतला. आयुर्वेदानुसार काशाच्या थाळीने तेल लाऊन मसाज केल्यास शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते.थकवा दूर होतो.तळपायाची सूज कमी होते.तसेच व्हेरिकोज व्हेन्स या विकारावर उपयुक्त असते असे शाम खांडेलवाल व दीपक लोया यांनी संगितले.या सेवेचा लाभ शेकडो वारकर्यांनी घेतला
छायाचित्र :वारकरी चरणसेवा करताना शाम खांडेलवाल व दीपक लोया
© 2011. Peoples Media Pune